Wednesday 25 September 2013

" भ्रष्टाचार "

आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन " स्वार्थ " या एकाच गोष्टी पर्यंत सीमित झाली आहे. समाजात सर्वत्र
" स्वार्थ " हि प्रमुख अंग किवा मुलभूत गरज बनली आहे. समाजात अनैतिकता, अराजकता, आणि स्वार्थ युक्त  भावनांचा बोलबाला झाला आहे. परिणामी भारतीय संस्कृती आणि त्याचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. या सर्वाना जबाबदार एकाच गोष्ट ती म्हणजे
 " भ्रष्टाचार "

प्रत्येक सामान्य माणूस किवा श्रीमंत माणूस नेत्या पासून साध्या शिपाया पर्यंत प्रत्येक व्यक्तीला पैश्याची ची हाव झाली आहे. पैसा हेच सर्वकाही होवून बसले आहे. त्यामुळे श्रीमंत आणखीन श्रीमंत आणि गरीब आणखीन गरीब होत चालले आहे. राजकारणी ज्यांना आपण नगरसेवक, आमदार , खासदार नंतर मंत्रिमंडळात नेवून पोचवतो या अपेक्षेने कि ते समाजात काही बदल घडवून आणतील आणि या देशाला महासत्ता असलेला देश बनवतील पण हेच राजकारणी हातात सत्ता आल्या नंतर मला कुठे पैसा मिळतोय याचाच अर्थ स्वताचा आधी स्वार्थ पाहतात. आणि त्याच जनतेच्या पैश्यातून स्वताची ऐश करून घेतात. बर त्याला काही सीमा हि नाही राहिली.  अब्जोने पैसा स्विस बँकेत पडून आहे कोणाचा किती पैसा हेय सर्वाना माहित असून हि सरकार इतकी हतबल कशी की असू शकते हाच प्रश्न पडतो.

प्रत्येक गोष्टीसाठी पैसा । मग तुम्ही सरकारी किवा गैरसरकारी कोणत्याही खात्यात जा इथे तुम्हाला कोणतेही छोट्यातला छोटे काम का असेना " लाच " हि द्यावीच लागते विना लाच घेतल्या शिवाय काम होणे संभव नाही. साध्या  क्लार्क ते मंत्री संत्र्यांना लाच देवूनच आपली फाईल पुढे सरकली जाते.

बर हेय इथेच थांबत नाही शाळा कॉलेज मध्ये हि लाच असे प्रकार चालूच आहेत. नामवंत शाळेत admission घ्यायचे इथे डोनेशन च्या नावावर पैसे उकळले जातात.

बर इथवर ठीक आहे पण बँका जी प्रत्येक देशाची आधारस्तंभ आहे. तेथे हि भ्रष्टाचार आहेच की. आपण कोणत्या तरी लोन प्रपोझल साठी अर्ज करतो ती फाईल  कोणत्या न कोणत्या कारणाने reject केली जाते. आणि नंतर तिथेले ऑफिसर लाच घेवून ती फाईल मार्गला अशी लावतात.

आता नंबर येतो देशाची सुरक्षा ज्यांचा हातात आहे त्यांचा म्हणजे " पोलिस विभाग " यांच्यावर कुणाचाही कवडी मात्र विश्वास उरला नाहीये. सगळे पोलिस विभाग मंत्र्याचे हाथचे कटपुतली होवून नाचत आहे. " जमुरे नाच म्हणाले कि नाचणार थांब म्हणाले कि थांबणार " त्यामुळे दाभोलकर करांची हत्या होवून महिना उलटून गेला तरी अजून निकाल लागला  नाही.

या सगळ्या कारणांना एकाच गोष्ट मला कारणीभूत आहे असे वाटते ती म्हणजे " भ्रष्टाचार " भारताला जगाच्या अर्थव्यवस्थेत आणि प्रत्येक विभागात उदारणार्थ सरकारी, गैरसरकारी , पोलीसदल आणि अशा इतर अनेक गोष्टीत जगात नंबर एक देश बनायचे असेल तर भ्रष्टाचार रुपी नागाला वेळीच ठेचले पाहिजे. तरच आपला भारत एक महासत्ता देश म्हणून उभारू शकेल.

त्यासाठी आपण सामान्य नागरिकांनी प्रयन्त केले पाहिजे. सगळ्यात पहिले प्रत्येकाने मनोबल वाढवले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीने आपल्याला दिलेले काम प्रामाणिकपणे पार पडले पहिजे. मग ती व्यक्ती सरकारी , गैरसरकारी किवा कोणताही विभागातील काम असेना ते प्रामाणिकपणे कोणत्याही स्वरुपाची लाच न घेता करावी.

तसेच शिक्षण क्षेत्रात पण या बाबत नवीन पायंडे पडले पाहिजेत. जेणे करून आपली नवीन पिढी आपल्या जुन्या प्राचीन संस्कृती तसेच नैतिक प्रमानांचे  संस्कार शिकून घेवून त्या  स्वरुपात विकसित झाली पाहिजे.

तसेच न्यायव्यवस्था पण कठोर करण्यात आली पाहिजे आणि याच आधारे आपल्याला पुढे जावे लागेल तेव्हाच या भ्रष्ट्राचारावर आपण काही अंश तरी लगाम घालू शकू…

Thursday 20 June 2013

ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

सुप्रभात मित्रहो,

तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती.

तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...थोडा जरी शोधायला उशीर झाला की मात्र लगेच रुसायची...ती होती गाण्यांची दिवानी..तिला आवडायची...सगळी सुंदर गाणी....मी देखील मग फक्त तिच्या साठी सगळी शोधाशोध करायचो....मला नव्हती गाण्यांची आवड....तरी तिच्या साठी फक्त ऐंकायचो...कधी मित्रा कडून मिळव..तरी कधी दुकानात जावून तिच्यासाठी सिडिस घ्यायचो...मग ती जेव्हा गोड हसुन "थॅक्स" म्हणायची, तेव्हा ती खुपच छान वाटायची...

तसा मी खुप समजुतदार,पण तिच्यासमोर वेंधळ्यासारखा वागायचो..सांगायचे काही वेगळेच असायचे,पण काही वेगळेच बोलायचो....मग मात्र ती खुप खुप चिडायची..तू काय मुर्ख आहेस का?असे सुद्धा म्हणायची.तिच्या नाकावर कधी कधी खुप राग असायचा,कधी शब्दातून नाही दिसला तरी,तो तिच्या अबोल्यातून कळायचा.अश्या वेळी ती खुप खुप गप्प असायची,मी एकटाच "हाय" करायचो तरीही नाही बोलायची.मी मात्र सगळ काही हसण्या वरती न्यायचो...तिच्या समोर जरी वेधळा असलो तरी, तेव्हा मात्र समजुतदार व्हायचो.तिलाच माझी नंतर थोडी थोडी दया यायची,मग ती हळूच हसायची....तिची कळी खुललेली पाहून,माझी मुद्रा ही खुलायची...

एक दिवस का कुणास ठाऊक कसे आक्रीत घडले...नियतिच्या मनात काही वेगळेच असते, हे त्या दिवशी कळले.सांगायचे होते काय? आणि प्रकरण भलतीकडे वळले.....माझ्या ही डोक्यात त्या दिवशी भरपुर राग गेला...शस्त्रांनी जितक्या जखमा केल्या नसतील..तितक्या दोघानाही शब्दानी झाल्या.देवाला ठाऊक असेल फक्त,कोणी कोणाला हर्ट केले,पण एक मात्र नक्की, तिचेमाझे भांडण झाले.मैत्री पेक्षा तिचे माझे इगो मोठे झाले,शेवटी एकमेकाशी न बोलायचे ठरले अन दोघांचे जीव शांत झाले.मी मात्र आज ही तिला खुप मिस करतो,आता ती कशी असेल,याचा सुद्धा विचार करतो. तिच्या काळजीने आज ही जीव तितकाच जळतो.कधी कधी तिच्याशी खुप बोलावेसे वाटते,आज काय घडले ते सगळे सांगावेसे वाटते.विचार येतो मनात,"ती तुला विसरली सुद्धा असेल,तू कोण हे देखील तिला आठवत नसेल."......फोन पर्यन्त हात जातो,पण मी रिसिव्हर खाली ठेवतो...आज नाही पण उद्या नक्किच बोलू असे मनात म्हणतो...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

आजकाल कोणाशी मैत्री करायची देखील भिती वाटते.कारण ज्याना आपण आपले मानतो,तिच व्यक्ती शेवटी तोडून जाते...तोडने किती सोप्पे असते,पण जाणाऱ्यांना त्याची काही किंमत नसते.ते हरवून जातात या विश्वाच्या पसाऱ्यात....ठेवून जातात मना मध्ये आठवणींचे मोरपंख,दुखऱ्या जागाना ह्ळुवारपणे स्पर्श होवून,जखमा अधिक सुगंधी करण्यासाठी.....मी आजही वाट पाहतोय तिच्या परत येण्याची,ती अशीच विश्वाच्या पसाऱ्यात हरवली आहे,की तिच्या कोशात ते तिला माहित...पण खात्री आहे एक ना एक दिवस ती नक्की परत येईल...पुन्हा भांडण करण्यासाठी.मीही तिची आतुततेने वाट पाहतो आहे,तिला पुन्हा पिडण्यासाठी......कारण ती माझी........

Monday 10 June 2013

Prem


प्रिय ....

काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही, हा प्रश्न मला आजही पडतो. तुझं ते येणं, हसणं, माझ्याशी बोलताना घाबरणं, कधीकधी गोंधळणं अजूनही मला सर्व काही आठवतं. तू आल्यावर मला काही सुचायचंच नाही. फक्त तुझ्याकडे बघत राहावं, असं वाटायचं. तू गेल्यावर मैत्रिणीबरोबर मी तुझ्यावर शेरेबाजी करायचो. माझ्या प्रेमाचं गुपित मी मनातच ठेवलं. म्हणतात ना, 'काही नाती असतात अबोलपणे बोलण्याची, मनातल्या मनात जोडून मनातच तोडण्याची...' मला अजूनही तुझी पहिली भेट आणि बाकीच्या आठवणी लक्षात आहेत. त्या कधीच विसरू शकणार नाही. ज्या गोष्टी आपण विसरत नाही, त्यालाच तर आठवणी म्हणतात. नंतर मी स्वत:मध्येच हरवू लागलो. नेहमी तुझाच विचार करायचो. तुझ्या वागण्यातून मला एक प्रकारचा संकेत मिळायचा. पण वाटायचं, की हा माझा भास तर नाही ना? आपण एकमेकांशी मैत्रीसुद्धा केली नाही.  आपण दोघं एकमेकांच्या समोर असल्यावर एवढं गोंधळायचो, की काय बोलायचं हे सुचायचंच नाही. मी तुला जितकं विसरायचा प्रयत्न करतो, तितकाच तू मला आठवत राहतेस. जेव्हा मला खूप मनापासून वाटत असतं, की तू दिसावास तेव्हा प्रत्यक्षात तू दिसत नाहीस. पण माझ्या ध्यानीमनी नसतानाही अचानक तू मला दिसतेस. असं का होतं? तुला पाहिलं, की माझे डोळे लगेच भरून येतात. आनंदाने की दु:खाने, हे माझं मला समजत नाही. जेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्यापासून खूप दूर होतीस. आजही मला तू हवी आहेस. पण तू माझ्या जवळ नाहीस. मला फक्त एकदाच तुला सांगायचं आहे, की मी तुझ्यावर खूप भरपूर, सॉल्लिड... माझ्याकडे शब्दच नाहीत, पण खरंच प्रेम करतो…

तुझाच 

Sunday 9 June 2013

Geography & Love


खूप वर्षापूर्वी एका मैत्रिणी ने Geography आणि Love या विषयावर लिहायच Challenge दिलं होत. मग मी पण डोक चालवलं आणि एक फ़ुल्ल
टाईमपास Passage 'फेकला'… आज ड्राफ्ट मध्ये सापडला … शेअर करतोय .. hehehe ,Enjoy.

जगातील मोठ्या नद्यांपैकी एक अशी नाइल नदी ही भूमध्य समुद्रासारख्या छोट्या समुद्राला जाउन मिळते .कदाचित 'नाइल' चा प्रियकर 'भूमध्य समुद्र' असेल...

प्रेम 'सोय' बघत नाही...म्हणूनच ती नदी इतक्य दूर प्रियकराला भेटायला जात असावी ..
म्हणूनच कदाचित अटलांटिक आणि हिंदी महासगारांचा भव्यदिव्यपणा,आणि रुबाब तिला भुरळ घालत नसावा..
केवळ प्रेम असल्यामुळेच अटलांटिक किंवा हिंद महासागरासारखे भव्य दिव्य पर्याय उपलब्ध असताना देखील भूमध्य सारख्या तुलनेने छोट्या समुद्राकडे ती आकर्षित झाली असावी...
म्हणून केवळ जवळ असणे किंवा सोय पहाणे ही प्रेमाची लक्षणे नाहीत .... खर्या प्रेमाला भौगोलिक बंधने असू शकत नाहीत...
आणि प्रेम हे 'भव्यते' वर ठरत नाही...
प्रेमासाठी महासागरा प्रमाणे तुमच्या कड़े खुप सम्पत्ती ,मानमरातब ,प्रतिष्ठा असण्याची गरज नाही...
गरज आहे ती ...प्रचंड ओढीची.. …. हेच तर 'नाइल' ला सांगायचे नसेल....?

Saturday 8 June 2013

स्वच्छंदी जगा मित्रहो !!!

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण. परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता!’

सिग्नलला गाडी थांबते. चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण. २-३ रुपये द्यावे असे मनात येते. रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो. तेवढ्यात सिग्नल सुटतो. गाडी पुढे घ्यायची वेळ येते. थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते, ‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला!’

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्‍वासाने सांगतो. त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात. वाईट वाटते खूप. नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो. ‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो. जेवणाची सुट्टी संपते. तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो. क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही, निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी. छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात. खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात. गेलेले क्षण परत येत नाहीत. राहतो तो ‘खेद’, करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा...

जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीयेना ते ‘चेक’ करा.

आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका. चांगल्या गोष्टीची दाद द्या आवडले नाही तर सांगा, घुसमटू नका. त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा. नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या. त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले! आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर लाईफ कसले! मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर कसले लाईफ! आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर लाईफ कसले..!

Thursday 11 April 2013

मैत्री कि प्रेम ....

एक मुलगी होती साधी सरळ थोडीसी खट्याळ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली....
आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला....
अशीच दोघांची एकदा ओळख झाली
.....आणि त्यांची छान मैत्री झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....
ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची....
जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा.
तिला विचारायचा
"का ग क...ाल तू फोन नाही केला,मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची ".
ती त्याला त्याला म्हणायची कि,
" नाही sorry काल नाही जमल फोन करायला".
तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा... त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...
रोज त्यांचे फोन आणि sms चालू राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...
तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms नाही करायचं...
तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे..ती त्याला sms करायची......
त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...
किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती
त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही...........
त्याच्या विचारात असताना त्याचे बोलणआठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत
बसायची.
" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "
आता तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला
त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या आवाजात ती आनंदी व्हायची....
हळू हळू ती त्याच पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा..."अग ं तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?."
ती त्याला म्हणायची "मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू शकत "..
अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्य ाशिवाय तिच्या मनात कोणी नसे..
...तिला त्याच्याबद्दल सगळ माहित आहे होत.... तो कसा आहे ? त्याचा स्वभाव कसा आहे ?
त्याच दिनक्रमच तिला माहित झाल होत..तो कधी जेवतो.... घरी किती वेळ
असतो... मित्रान बरोबर किती वेळ असतो...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटत
होत कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण तस काही नव्हते.
असच एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच् या पण गप्पा छान रंगल्या होत्या
..आता तिला त्याच्या मनातल जाणून घ्यायचं होत....पण काही केल्या तिला ते
जमत नव्हते...मग त्यानेच तिला विचारले" तू लग्न कधी करतेस ?".त्यावर ती
चटकन त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर नाही अजून वेळ आहे बघू "....मग
तीने त्याला विचारलं " तू कधी करतोस लग्न"..तो तीला म्हणाला " मी लग्न
करणार नाही. मी एकटाच बरा आहे..".ती खूपदुखी होते... काही क्षण तिला काहीच
सुचत नाही..हा असा का बोलत आहे..पण स्वतःला सावरून ... ती परत त्याला
विचारते... " तू असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात काही घडल आहे
का?"..तो अपसेट होऊन तिला म्हणतो " होय, आणि आता मला कोणीच नको मी एकटाच
बरा आहे खूप सुखी आहे ".त्याच्या आयुष्यात खूप काही घडल आहे असे तिला वाटू
लागल..मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात ... आणि ती
त्याच कोमजलेला चेहरा फुलवते...
" सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"
तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून जातो.
"तू खूप चांगली आहेस... तुझ चांगलच होईल..."
पण ती मनातल्या मनात म्हणत असे..... माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्यासोबत असशील"
करण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती...........

Sunday 24 March 2013

सुंदर अर्थपूर्ण प्रेमळ कथा

"सांगली जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता, त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे, ........ आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,

"राजू,
तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती"

दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले,

" बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत"

दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.

लगेच मुलाचे पत्र आले, " बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा" ............ इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.

तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.

♥ IT IS THE THOUGHT THAT MATTERS.. NOT WHERE YOU ARE OR WHERE THE PERSON IS… ♥

मनः शांती

एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .

एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.

काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."
तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.

जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.
ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."
एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"

तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."

एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,

"हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."

Saturday 23 March 2013

Eka Divsacha Pandurang

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !!

"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"

त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"

पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.

तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,

श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"

(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )

गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"

( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )

पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "

(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"

(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)

रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"

गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........

पांडुरंग पुढे म्हणतो .........

अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.

त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.

पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"

तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.